प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.
मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!
फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक – प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास ‘रक्तलांच्छन’ मधे सडेतोडपणे मांडला आहे.