अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेल्या, समृध्दतेचा आणि संपन्नेचा वारसा जपणाऱ्या, विविध लोकसंस्कृतीचा उगम असणाऱ्या आपल्या भारत देशावर पूर्वीपासूनच अनेक परकीयांनी सातत्याने आक्रमणे केली. शस्त्रबळाच्या जोरावर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु भारतातील शूरवीरांनी त्यांच्याशी प्राणपणाने लढा देऊन, त्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. रक्ताचा सडा शिंपून स्वदेशाच्या रक्षणार्थ उभ्या ठाकणाऱ्या भारतीय वीरांच्या या प्रेरक शौर्यकथा.