काही गल्बला काही निवळ| ऐसा कंठीत जावा काळ| जेणे करिता विश्रांती वेळ| आपणासी फावे||१९|८|२९|| दुसऱ्याच्या दुःखे दुखवे| दुसऱ्याच्या सुखे सुखावे| अवघेची सुखी असावे| ऐसी वासना||१९|४|२३|| नारायण असे विश्वी| त्याची पूजा करीत जावी| या करणे तोषवावी| कोणीतरी काया ||१५|९|२५|| व्यक्तीमधे परिवर्तन होऊन आदर्श कुटुंब, आदर्श समाज, आदर्श राजा आणि आदर्श राष्ट्र निर्माण करणे हा समर्थांचा ‘कर्मयोग’ होता. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे अविश्रांत परिश्रम केले. शिवराज्यभिषेक हे त्यांचे स्वप्न साकार केले. त्यांचा हा कर्मयोगाचा इतिहास या ग्रंथात पहावयास मिळले
Reviews
There are no reviews yet.